सर्व शिक्षा अभियानाचा जिल्हा परिषद शाळेवर झालेला प्रभाव: चंद्रपूर जिल्ह्याच्या विशेष संदर्भात

Authors

  • किशोर गुरुदास हुमने, प्रा. डॉ. प्रकाश बि. तितरे,

DOI:

https://doi.org/10.8224/journaloi.v74i2.790

Abstract

              2001 मध्ये सुरू करण्यात आलेला सर्व शिक्षा अभियान हा भारतातील सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करण्यासाठीचा एक प्रमुख कार्यक्रम आहे. प्रस्तुत संशोधनकार्यात महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवर सर्व शिक्षा अभियानच्या परिणामाचे परीक्षण करण्यात आले आहे. ज्यामध्ये शाळेतील पायाभूत सुविधांचा विकास, नोंदणी दर, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर, शिक्षणावरील परिणाम यावर लक्ष केंद्रित केले आहे. सर्वेक्षण व मुलाखतीच्या माध्यमातुन माहिती मिळविण्यात आली आहे. संशोधनकार्यात वर्णनात्मक संशोधन आराखडा निवडुन संशोधकानी संभाव्यता पद्धतीतील साधा यादृच्छिक नमुना निवडण्यात आला आहे व प्राथमिक माहिती संकलित करण्याकरिता प्रमाणीकृत प्रश्नावलीचा उपयोग करण्यात आला. प्राप्त झालेल्या माहितीचे सांख्यकिय विश्लेशण SPSS 18.0 या सॉफ्टवेअरद्वारे करण्यात आले. संशोधनात प्राप्त परिणामांवरून असे निदर्शनास येते की सर्व शिक्षा अभियानामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत थोडीशी सुधारणा झाली आहे, त्याचप्रमाणे बहुतांश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. प्राप्त परिणामांवरून असे निदर्शनास येते की मिशनच्या निधीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक वातावरण सुधारले आहे.

Downloads

Published

2000

How to Cite

किशोर गुरुदास हुमने, प्रा. डॉ. प्रकाश बि. तितरे,. (2025). सर्व शिक्षा अभियानाचा जिल्हा परिषद शाळेवर झालेला प्रभाव: चंद्रपूर जिल्ह्याच्या विशेष संदर्भात. Journal of the Oriental Institute, ISSN:0030-5324 UGC CARE Group 1, 74(2), 92–97. https://doi.org/10.8224/journaloi.v74i2.790

Issue

Section

Articles