शालेय शिक्षणातून उर्जा संवर्धन: काळाची गरज
DOI:
https://doi.org/10.8224/journaloi.v73i3.788Abstract
आजच्या युगात ऊर्जा संवर्धन ही केवळ एक गरज नसून आपल्या भविष्यासाठी अत्यावश्यक कर्तव्य बनली आहे. वाढते औद्योगीकरण, नागरीकरण आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे ऊर्जेचा अपव्यय झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणातून ऊर्जा संवर्धनाची संस्कृती निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ती समाजघटनाही घडवते. लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा बचतीची सवय निर्माण केली, तर त्यांचा दृष्टिकोन पर्यावरणस्नेही आणि जबाबदार नागरिकत्वाकडे वळतो. अभ्यासक्रमात ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व, नवीनीकरणयोग्य ऊर्जा स्रोतांचा उपयोग, घरगुती उपकरणांचा सुजाण वापर, आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचे मार्ग यांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण होते. शाळांमध्ये सौरऊर्जा वापर, ऊर्जा बचत मोहीमा, प्रात्यक्षिके आणि निबंध/चित्रकला स्पर्धा यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकता येते. या प्रयत्नांमुळे ते स्वतःसह आपल्या कुटुंबालाही ऊर्जा बचतीस प्रवृत्त करतात. ऊर्जा संसाधने ही मर्यादित आहेत, त्यामुळे त्यांचा योग्य वापर करणे ही सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे. शालेय शिक्षण हे या बदलाची पहिली पायरी ठरू शकते. म्हणूनच, ऊर्जा संवर्धनाचे मूल्य शालेय स्तरावरच रुजवणे ही काळाची गरज आहे.